Wednesday, April 21, 2010

खात्री?

‘‘प्रत्येक पत्राच्या शेवटी बायका ‘ताजा कलम’ का लिहितात हेच समजत नाही!’’ अनंतराव आपल्या पत्नीला म्हणाले.
‘‘काहीतरीच बोलता तुम्ही!’’ उषाताई म्हणाल्या, ‘‘आता मी तुम्हाला पत्र लिहीन, त्यात ताजा कलम असतो का पाहा!’’
दुसऱ्या दिवशी अनंतराव ऑफिसात गेले असता त्यांना उषाताईंची चिठ्ठी आली. शेवटी सही करून झाल्यावर उषाताईंनी लिहिले होते, ‘‘ता.क. आता तरी झाली ना खात्री?’’

No comments: