Monday, May 25, 2009

गोळीबार

प्रमिलाबाईंनी रामरावांना दारातच जाब विचारला. ऑफिसमधून आज घरी यायला तुम्हाला इतका उशीर का झाला? रामराव म्हणाले, अगं रस्त्यात एका ठिकाणी गँगवॉर सुरू होतं ती गंमत पाहत उभा होतो म्हणून उशीर झाला. अहो पण एखादी गोळी आपल्याला लागेल याची भीती नाही वाटली तुम्हाला? रामराव म्हणाले, भीती? आणि मला? अगं दिवसभर मी तोफेच्या तोंडी असतो. त्यापुढे या गोळीबाराची भीती कसली आलीय?

No comments: